नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2021 -22 या वर्षासाठीचा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सोमवारी संसदेत सादर केला आहेत. अर्थसंकल्प “कधी नव्हे इतका चांगला’ असणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना देत सर्वसामान्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी त्या काय करतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मत व्यक्त केले आहे.
माध्यमांशी बोलतांना संजय राऊत म्हणाले,’ यंदाचा अर्थसंकल्पात मोदी सरकारकडून गरीब आणि मध्यमवर्गीयांना दिलासा देणारी घोषणा झाली पाहिजे. या बजेटमूळे गरीब आणखी गरीब होता कामा नये.
ते पुढे म्हणाले,’ केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्राच्या वाट्यातील जीएसटीचे पैसे लवकरात लवकर द्यावेत. म्हणजे आम्हाला कोरोनाच्या संकटातून अर्थव्यवस्था बाहेर काढता येईल. तसेच सर्व सामान्यांना कोरोनाची लस मोफत देण्यासंदर्भातही विचार झाला पाहिजे.’ अशी अपेक्षा संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केली आहे.