Sanjay Jadhav on Mahadev Janakar। लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून जागावाटपात परभणीसाठी राष्ट्रीय जनता पक्षाचे नेते महादेव जानकर यांना याठिकाणी उमेदवारी दिली. उमेदवारी मिळाल्यानंतर महादेव जानकर यांनीही परभणीत मुक्काम ठोकला आहे. त्यासाठी जोरदार प्रचार देखील करण्यात येत आहे. त्यांच्या प्रचारावर आता विद्यमान खासदार संजय जाधव यांनी टीका केली.
जो आई-वडिलांना भेटत नाही, तो…Sanjay Jadhav on Mahadev Janakar।
परभणीत प्रचार सभेला संबोधित करताना संजय जाधव यांनी जानकरांवर टीका केली. यावेळी बोलताना त्यांनी, “काळ कठीण आहे. सर्वांनी हुशारीने वागले पाहीजे. हे सरकार उलथवून टाकणे आपली नैतिक जबाबदारी आहे. “एकीकडे काही जण संविधान बदलण्याची भाषा बोलत आहेत. काहीजण पाच-पाच वर्ष मायबापाला (आई-वडिलांना) भेटत नाहीत, असं म्हणत आहेत. जर पाच-पाच वर्ष आई-वडिलांना भेटत नसाल तर मग पाच वर्ष मतदारांना कसे भेटणार?”, अशी सडकून टीका संजय जाधव यांनी केलीय.
“महायुतीकडे जिल्ह्यात एकही माणूस नव्हता का? Sanjay Jadhav on Mahadev Janakar।
महादेव जानकर यांना उमेदवारी दिल्याबद्दलही संजय जाधव यांनी आश्चर्य व्यक्त केलं. “महायुतीकडे जिल्ह्यात एकही माणूस नव्हता का? महादेव जानकरांसारखा साताऱ्याचा माणूस उमेदवार कशासाठी आणला? मग उद्या आम्ही छोट्या छोट्या कामासाठी साताऱ्याला जायचं का? आम्ही इथल्या मतदारांच्या रक्ता-मासाची माणसं आहोत. अर्ध्या रात्री जरी आम्हाला हाक दिली तर आम्ही उठून येऊ”, असे सांगताना जाधव यांनी मराठीतील एक म्हण सादर करून जानकरांना टोला लगावला.
ते म्हणाले, “आपल्याच्या पायताणाला बसावं, पण शेजारच्या उशाला बसू नये” किंवा “जेवायला उकीरड्यावर बसावं, पण वाढ्या आपला असावा”, आम्ही तुमचेच वाढे आहोत. तुमच्या जीवनात एखादा वाईट प्रसंग येईल, तेव्हा तुमच्यासाठी मी अर्ध्यारात्री उठून येऊ, असा शब्द देतो. असे त्यांनी यावेळी म्हटले.