मुंबई – सीबीआयकडून समीर वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भ्रष्टाचार प्रकरणी वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. वानखेडे यांच्या घरावर सीबीआयचा छापा पडल्याचीही माहिती मिळत आहे. समीर वानखेडे यांचं अंधेरीमधील घर आणि मुंबईतल्या काही भागांमध्ये सीबीआयची छापेमारी सुरू आहे. आर्यन खान प्रकरणामध्ये समीर वानखेडे चर्चेत आले होते.
आर्यन खान केस प्रकरणी समीर वानखेडेंनी 25 कोटी मागितल्याचा आरोप आहे आणि अजून एका केसमध्ये समीर वानखेडेंनी 50 लाख रुपये स्वीकारल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. एनसीबीच्या रिपोर्ट दिल्यानंतर समीर वानखेडे सीबीआयने वानखेडेंच्या घरावर छापा टाकला आहे. या प्रकरणाची एनसीबीचे व्हिजलन्स ऑफिसर चौकशी करत आहेत.
वानखेडे जेव्हा मुंबई एनसीबीचे प्रमुख होते तेव्हा त्यांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केली होती, त्यावेळी वानखेडे यांच्यावर पैशांचा घोळ केल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर या आरोपांची चौकशी करताना त्यांच्या हाती काही पुरावे लागले आहेत. या आधारावर सीबीआयने समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमवर गुन्हा दाखल केला आहे. याचसोबत सीबीआयचे 29 ठिकाणी छापे सुरू आहेत, या छापेमारीमध्ये सीबीआयच्या हाती काय पुरावे लागतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.