मुंबई – भारतीय महसूल सेवेतील (आयआरएस) अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात मद्यालयाचा (बार) परवाना काढताना खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी समीर वानखेडे यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली असून याचिका दाखल केली आहे.
दरम्यान हायकोर्टाने समीर वानखेडे यांना दिलासा देताना अटकेपासून संरक्षण दिले आहे.एनसीबीत कार्यरत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या जावयाला अटक केल्याचा सूड उगवण्यासाठी आपल्याविरोधात ही करण्यात आल्याचा दावा वानखेडे यांनी याचिकेत केला आहे. दरम्यान समीर वानखेडे यांनी अटकेपासून संरक्षण देण्याची मागणीही केली होती.
राज्य सरकारने मात्र समीर वानखेडेंच्या याचिकेला जोरदार विरोध करण्यात आला. राज्य सरकारने अटक करणार नाही अशी हमी देण्यास नकार देत आपली भूमिका कायम ठेवली आहे. यावेळी कोर्टाने प्राथमिक तपास सुरु असताना अटकेची गरज काय? अशी विचारणा केली, तसंच याचिकाकर्ता केंद्रीय तपास यंत्रणेचा वरिष्ठ अधिकारी असताना अटकेसाठी इतका अट्टहास का? असेही विचारले.