नेपाळ : दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पुरूष संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे कबड्डीत भारताचे आणखी एक पदक निश्चित झाले आहे. विजेतेपदासाठीच्या अंतिम सामन्यात आज (सोमवारी) दुपारी २ वाजता ‘भारत-श्रीलंका’ असा सामना रंगणार आहे.
तत्पूर्वी, भारताच्या पुरूष संघाने रविवारी झालेल्या शेवटच्या साखळी लढतीत नेपाळचा ६२-२६ असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारताने मध्यंतरापर्यत ३२-१३ अशी आघाडी घेतली होती, त्यानंतर उत्तरार्धात देखील आक्रमक खेळ करत ३६ गुणांच्या फरकाने सामना खिशात टाकला.
भारताकडून पवन कुमार, दीपक हुड्डा, विशाल भारव्दाज, नितेश कुमार यांच्या चढाई-पकडीचा खेळ या विजयात महत्वाचा ठरला. तर दुसरीकडे श्रीलंकेने बांगलादेशला ३५-२० अस नमवत अंतिम फेरी गाठली आहे, आता विजेतेपदासाठी भारताची लढत श्रींलका संघाशी होईल.