ठाणे जिल्ह्यातील माहुली किल्याच्या लगट असणारा बेभान उंच कातळकडा म्हणून त्याची ओळख असणारा वजीर सुळका (hight २५० ft) सर करून S.L. Adventure Team ने *पद्मविभूषण महाराष्ट्र भूषण शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
या वेळी बोलताना गिर्यारोहक तुषार दिघे म्हणाले की एक चालता-बोलता इतिहास अखेर इतिहासजमा झाला ! बाबासाहेब जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रालाच दुख झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना घराघरात पोचण्याचे कार्य करत असताना कधी शंभरी घाटली समजलंच नाही.
गिर्यारोहनामधे काम करत असताना अनेक गडकिल्ले आम्ही फिरत असतो बऱ्याच वेळा ऐतिहासिक ठिकाणी गेल्यावर बाबासाहेब यांची आठवण आल्या शिवाय राहणार नाही. आपण आपल्या कार्यातून एक अनोखी मानवंदना म्हणून वजीर सुळका सर करून संपूर्ण टीमने श्रध्दांजली वाहण्यात आली.
या वेळी उपस्तीत लहू उघडे, तुषार दिघे, कृष्णा मरगळे, मनोज वांगड, योगेश करे, शंकर मरगळे,मंगेश सांबरे, राज जानकर, सूरज भगत,उपस्तीत होते.