नवी दिल्ली : देशातून पळून गेलेल्या 51 जणांनी 17 हजार 900 कोटी रुपये बुडवले आहेत, अशी माहिती सरकारने आज राज्यसभेत दिली. केंद्रीय अर्थराज्य मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी एका प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती देण्यात आली आहे.
सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार या फरार झालेल्या 51 आरोपींविरोधात 66 खटले दाखल आहेत. मात्र हे आरोपी परदेशांत पळून गेले आहेत. या प्रकारात त्यांनी बुडवलेली रक्कमही सुमारे 17 हजार 947.11 कोटी रुपये आहे. या प्रकरणात इडी आणि सीबीआयने संबंधित न्यायालयात खटले दाखल केले आहेत. या प्रकरणातीलारोपींना देशात आणण्यासाठी संबंधित देशांशी प्रत्यार्पण कारारन्वये संपर्क साधला असल्याचे त्यांनी सांगितले.