IPL 2024 : मुंबई इंडियन्सने आयपीएल 2024 साठी वेगळ्या पद्धतीने तयारी केली आहे. आधी त्यांनी हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्सकडून घेतले आणि नंतर त्याला कर्णधार म्हणून नियुक्त केले.करत पाच वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवण्याचा निर्णय घेतला. संघाच्या या निर्णयावर लाखो चाहते आणि अनेक माजी क्रिकेटपटू नाराज असून त्यांनी त्यावर टीकाही केली. अशात माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी मुंबई टीमने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करत रोहित शर्माबाबत महत्वाचे वक्तव्य केलं आहे.
T-२० क्रिकेटमध्ये रोहित शर्मा एक फलंदाज म्हणूनही माझ्यासाठी आता प्रश्नचिन्ह बनला आहे. असं म्हणत मांजरेकर यांनी रोहितच्या T-२० फॉरमॅटमधील फलंदाज म्हणून भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत रोहितने आक्रमक फटकेबाजी केली खरी, परंतु ट्वेंटी-२० फॉरमॅट हा पूर्णपणे वेगळा आहे. वनडेत तुम्हाला माहित असते की तुमच्याकडे ५० षटकं आहेत. त्यानुसार त्यापद्धतीने बॅटिंग होते आणि बॉलिंगही वेगळ्या टप्प्यात मारा करतात असे मांजरेकर म्हणाले.
हार्दिक पांड्या हा नवा कर्णधार आहे असे नाही, त्याने दोन वर्षे गुजरात टायटन्सचे नेतृत्व केले आहे. त्याने एका सत्रात गुजरातला चॅम्पियन बनवले आणि दुसऱ्या सत्रात संघ अंतिम फेरीत पोहोचला आणि शेवटच्या चेंडूवर चेन्नई सुपर किंग्जविरुद्धचा सामना हरला. आयपीएलमध्ये कर्णधार आणि फलंदाज म्हणून रोहित शर्मासाठी गेली काही वर्षे चांगली राहिलेली नाहीत. खरं तर, शेवटच्या वेळी त्याने 2019 मध्ये 400 धावांचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर त्याला पुढील स्पर्धांमध्ये केवळ 332, 381, 268 आणि 332 धावा करता आल्या. असही मांजरेकर म्हणाले.