मुंबई – राजधानी दिल्ली पाठोपाठ आता राज्यातील शेतकरी देखील केंद्र सरकारच्या कृषी कायद्यावरून आक्रमक झाले आहेत. केंद्र सरकार शेतकऱ्यांना समजून घेण्यास कमी पडत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले होते. आता त्यावर भाजपनेते निलेश राणे यांनी रोहित पवार यांच्यावर घणाघाती टीका करत त्यांना नकलीपणा करत असल्याचे म्हलटे होते. त्यावर आमदार रोहित पवार यांनी देखील चोख प्रत्युत्तर दिले.
निलेश यांनी म्हटले होते की, ‘नकलीपणा काय असतो बघायचं असेल तर हे वाचा. जे रोहित पवार शेतकरी कायद्यांचा संदर्भ देऊन शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच रोहित पवारांची स्वतःची कंपनी शेतकऱ्यांना करार करण्याचे फायदे सांगत आहेत.’ असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.
कृषी कायद्यांना शेतकऱ्यांचा असलेला विरोध आणि या पार्श्वभूमीवर होत असलेले शेतकरी आंदोलन हा खूप महत्वपूर्ण विषय आहे. यासंदर्भात, मी ४ डिसेंबर २०२० रोजी लिहिलेल्या पोस्टचा आधार घेऊन काही न्यूज पोर्टलने मी दुटप्पीपणा करत असल्याचा आरोप केलाय.https://t.co/0vm0wsWZro pic.twitter.com/Nk7aJrL1YU
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 25, 2021
निलेश राणे यांच्या टीकेला उत्तर देताना रोहित म्हणाले की, बातमीची शहानिशा न करता मला नकली म्हणणाऱ्यांनी कोकणातल्या निळ्याशार समुद्राकडून पारदर्शकता आणि निखळता हा गुण घेण्याची गरज आहे. केवळ क्षणिक प्रसिद्धीसाठी घरी बसून दुसऱ्याची मापं काढत बसलात तर लोकं कायमस्वरूपीच घरी बसवतील, असं म्हणत निलेश राणेंना टोला लगावला आहे. रोहित यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे.