अमरावती – राज्यात काही महिन्यापूर्वी झालेल्या सत्तांतरापासून ते आजपर्यंत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात शाब्दिक चकमक उडताना पाहायला मिळत आहे. त्यातच शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद न मिळलेल्या नेत्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चादेखील रंगू लागल्या आहेत. त्यामुळे यात कोण-कोणत्या नेत्यांचा समावेश करण्यात येतो वरून राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. नाराज असलेल्या आमदारांमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे अपक्ष आमदार बच्चू कडू देखील होते.
मंत्रिपद वाटपाच्या याच मुद्यावर आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलतांना शिंदे – फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. रोहित पवार म्हणाले,’ मंत्रीपद न मिळाल्याने नाराज मंत्रांच्या सर्वात पहिले बच्चू कडू यांचे नाव चर्चेत आहे. त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला चांगलाच इशारा दिला होता. मात्र बच्चू कडू यांना आता मंत्रिपद मिळणार नाही, हे लक्षात आले आहे. एवढेच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राला हे कळल आहे. असेही रोहित पवार म्हणाले आहे.
रोहित पवार पुढे म्हणाले,’शिंदे गटातल्या ४० जणांनाही मंत्रिपद हव आहे. तसेच भाजपच्याही अनेक नेत्यांना मंत्रिपद पाहिजे. त्यानुसार पाच आमदाराच्या मागे एक मंत्रिपद येऊ शकतं. अशात एकनाथ शिंदेंचा गट १२ च्या पुढे किंवा १४ पर्यंत राहिल. बाकीच्या २६ लोकांना काय मिळणार? त्याला एक पर्याय आहे. आपल्याकडे अनेक मंडळं आहेत. यांनी मंडळं वाढवले आहेत. अधिवेशनात त्यांना निधी दिलेला नाही. फक्त भाषण केलं. जेव्हा मंडळं येतील तेव्हा आमदारांना त्यांचं वाटप होईल आणि त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल.’ असं मंत्रिपदाच गणितही रोहित पवार यांनी समजून सांगितले आहे.