मुंबई : देशभरात कोरोनाशी लढण्यासाठी विविध उपाय योजना करण्यात येत असून 30 हजार रुपयांपेक्षा कमी पगार असणाऱ्यांचे पगार महिन्यातून दोनदा करण्यात येणार आहेत. या कर्मचाऱ्यांच्या हातात पैसा खेळता रहावा म्हणून ही उपाय योजना करण्यात येत आहे.
कोरोनाच्या लढतीत रिलायन्स समुह आणि संलग्न संस्थांचे 60 हजार सदस्य कृती कार्यक्रमात सहभागी झाले आहे. जर कंपनीचे काम थांबवावे लागले तर कंपनी सर्व कंत्राटी आणि तात्पुरत्या कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यात येणार आहे. त्याशिवाय शक्य त्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोरोना बाधितांसाठी मुंबईतील सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये महापालिकेच्या सहकार्याने 100 बेडचे केंद्र उभारण्यात आले आहे. या शिवाय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता निधीला एक कोटी रुपयांची देणगी देण्यात आली आहे.
सर्व आपत्कालीन सेवांसाठी विलगीकरण कक्षातून हलवण्यासाठी अथवा आणण्यासाठी आणि विलगीकरण कक्षाच्या भारत सरकारने दिलेल्या यादीतील व्यक्तींच्या ने आण साठी रिलायन्सच्या वतीने मोफत इंधन देण्यात येणार आहे, असे मुकेश अंबानी यांनी निवेदनात म्हटले आहे.