आजी, माजी मंत्री, आमदारांकडून कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना धमक्या
साकळाई पाणी योजने संदर्भात उपोषन करू नये यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील आजी, माजी आमदारांकडून साकळाई कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना धमक्या दिल्या जात आहे. तरीही आम्ही साकळाई योजनेसाठी क्रांतिदिनी आंदोलन करणार असल्याचे सिनेअभिनेत्री दीपाली सय्यद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
नगर – गेल्या 35 वर्षापासून साकळाई प्रश्न प्रलंबित आहे. आज पर्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे राजकारण करण्यात आले आहे. हे दुर्देव आहे. नगर व श्रीगोंदा तालुक्यातील गावांना वरदान ठरणारी साकळाई उपसा योजने संदर्भात राज्य सरकार ने ठोस निर्णय न घेतल्याने ऑगस्ट क्रांतिदिनी (दि.9) रोजी जिल्हा परिषदेसमोर उपोषण करण्याचा इशारा सिनेअभिनेत्री दिपाली सय्यद यांनी दिला आहे. यावेळी साकळाई कृती समितीचे बाबासाहेब झेंडे, राजाराम भापकर (गुरुजी), नारायन झेंडे, सोमनाथ धाडगे, बाळासाहेब नलगे, डॉ. कृषीराज टकले, सुर्यभान कोतकर, अमोल लंके, रोहिदास उदमले आदी उपस्थित होते.
यावेळी सय्यद म्हणाल्या की, दोन्हीं तालुक्यातील जिरायत भागाला जीवदान ठरणारी साकळाई उपसा योजनेबाबत अनेक वेळा आंदोलने झाली. लोकसभा निवडणूकीत नगर तालुक्यातील वाळकी येथे जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेपूर्वी साकळाई उपसा योजनेला प्रशासकीय मंजूरी दिली जाईल असे, आश्वासन दिल होते. परंतु आजवर या आश्वासनावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. क्रांतीदिनी जिल्हा परिषदेसमोर आपण उपोषणास बसणार असल्याचे त्यांनी सांगितले.
निवडणूकीच्या काळात या योजनेचा राजकीय मुद्दा म्हणून वापर केला. पण निवडणूका संपताच त्याचा या राजकीय नेत्यांना विसर पडला आहे. परंतु साकळाईच राजकारण न करता साकळाई प्रश्न सोडावा व या योजनेला प्रशासकीय मंजूरी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच मी विधानसभा निवडणूक लढविणार नसल्याचे ही त्यांनी सांगितले