मुंबई – महाराष्ट्र विधीमंडळातील भाजपच्या बारा आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द बातल ठरवले आहे हा लोकशाही वाचवणारा ऐतिहासिक निकाल आहे अशी प्रतिक्रीया विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
ट्विटरवरून त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, राज्य विधीमंडळात ओबीसींच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या भाजपच्या बारा आमदारांना बेकायदेशीरपणे निलंबीत करण्यात आले होते.
तो निर्णय रद्द करण्याचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा लोकशाही वाचवणारा, व ऐतिहासिक स्वरूपाचा आहे त्याचे आम्ही स्वागत करतो. हे निलंबन रद्द झाल्याबद्दल भाजपच्या या बारा आमदारांचे मी स्वागत करतो असेही त्यांनी म्हटले आहे. या निकालाने राज्य सरकारच्या हुकुमशाही प्रवृत्तीला चपराक बसली आहे असेही त्यांनी म्हटले आहे.