नगर -लॉकडाऊन काळात जप्त केलेले वाहने पोलीस प्रशासनाने परत कराव्यात अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेचे शहर जिल्हा संघटक मतीन सय्यद यांच्यावतीने पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शहरांमध्ये भाजीपाला, किराणामाल खरेदी करण्या करिता फिरत असताना पोलिसांनी अनेकांच्या दुचाक्यांवर कारवाई करून शहरातील कोतवाली, तोफखाना, भिंगार कॅंम्प पोलीस ठाण्यात जमा करण्यात आल्या आहेत. त्या दुचाकी वाहने जनहितार्थ ज्यांच्या त्यांच्या ताब्यात देण्यात यावी अशी, मागणी शहर जिल्हा संघटक मतीन सय्यद समवेत अल्पसंख्यांक महाराष्ट्र राज्य सचिव अतार खान, कलीम शेख, आसिफ शेख यांनी केली आहे.
आज कामधंद्यावर कंपनीमध्ये जाण्याकरिता व त्यांचा चरितार्थ चालवण्यासाठी दुचाक्या अत्यंत आवश्यकता आहे. कारण त्यावरच गोरगरिबांचे पोट आहे. अनेकांना शेतमाल आनण्यासाठी पायपीटी करावी लागत आहे. लॉकडाऊन काळात उत्पन्नाचे कुठलेही साधन नसल्यामुळे त्यांची दंड भरण्याची आर्थिक कुवत नाही. त्यामुळे जप्त केलेल्या दुचाक्या पोलीस प्रशासनाने जनहितार्थ संबधितांना द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे.