सातारा – व्हॉटस्ऍपवर मैत्री करून एका युवतीने बॅंड व्यावसायिकाला ठोसेघरला फिरण्यासाठी नेले. तेथे युवतीच्या कथित भावांची अचानक “एन्ट्री’ होऊन त्यांनी बॅंड व्यावसायिकाचे अपहरण केले. त्याला विविध ठिकाणी फिरवून अडीच लाखांची रोकड, पाच अंगठ्या आणि कार घेऊन टोळक्याने पलायन केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली.
याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात एका युवतीसह पाच जणांवर खंडणी व अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. सुधाकर बाबुराव गेजगे (वय 43, रा. माळवाडी, लाटे, ता. बारामती) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पैलवान उर्फ नितीन खरात, अनिल मदने (रा. पुसेगाव, ता. खटाव), सनीदेव खरात (रा. शिंदी, ता. माण), मुन्ना (पूर्ण नाव माहीत नाही, रा. खातगुण, ता. खटाव सातारा) अशी संशयितांची नावे आहेत. हे सर्व जण फरारी असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुधाकर गेजगे यांचे बॅंडपथक आहे. 4 डिसेंबर 2019 रोजी त्यांच्या व्हॉटस्ऍपवर एका युवतीचा मेसेज आला. तुम्हाला भेटायचे आहे, असे त्या युवतीने सांगितले. संबंधित युवतीने त्यांना सातारा बसस्थानकात भेटायला बोलावले. 6 डिसेंबर 2019 रोजी सुधाकर गेजगे हे सातारा बसस्थानकात आले. त्यावेळी आपण फिरायला ठोसेघरला जाऊ, असे युवतीने सांगितले.
टपऱ्या पुन्हा उभ्या राहिल्या आहेत. कारवाईत खंड पडल्याने विक्रेत्यांनी पुन्हा वेगवेगळ्या ठिकाणी पथाऱ्या मांडल्याचे दिसत आह. आरटीओ चौकाबरोबरच मोती चौक, चांदणी चौक, मंगळवार तळे रस्ता, मध्यवर्ती बसस्थानकानजीक आयआरके सिनेमा परिसरातील हातगाड्यांची अतिक्रमणे हटायला तयार नाहीत. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, बसस्थानक, राधिका रोड, जिल्हा रुग्णालय आवारातील अनेक टपऱ्या पथकाने जप्त केल्या.
रस्त्याकडेला उभारण्यात आलेले शेडही जमीनदोस्त करण्यात आले. इतके करूनही मोहिमेतील सातत्याच्या अभावी अतिक्रमणांनी मोकळ्या जागा व रस्ते पुन्हा भरत आहेत. अतिक्रमण हटाव मोहिमेत डंपर, जेसीबी, बुलडोझर या यंत्रणेसह मोठे मनुष्यबळ लागत आहे. एका दिवसासाठी येणारा खर्चही मोठा आहे. मात्र, प्रशासनाने अतिक्रमण मोहीम अधिक प्रभावीपणे राबवणे गरजेचे आहे.