मुंबई – शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह प्रविण राऊत यांच्यावर गोरेगाव येथील पत्रा चाळमधील रहिवाशांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) उपस्थित संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांना दिलेला जामीन रद्द करण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाला केली होती.
दरम्यान, आता संजय राऊतांचा जामीन रद्द करण्यासाठी याचिकेवरील सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. ईडीच्या याचिकेवरील सुनावणी आता 11 जुलैपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
संजय राऊत यांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. संजय व प्रविण राऊत यांचा जामीन रद्द करावा, अशी ईडीची मागणी होती. मात्र आता उच्च न्यायालयाने सुनावणी तहकूब केल्याने संजय राऊतांना काही दिवस दिलासा मिळाला आहे.