दुबई – हत्येच्या आरोपाखाली दुबईच्या तुरुंगात २००५ पासून असलेल्या तेलंगणातील पाच भारतीयांपैकी चार भारतीयांची सुटका झाली असून ते भारतात परतले आहेत.
शिवरात्री रवी, शिवरात्री मल्लेश, शिवरात्री हनुमंथू, नामपल्ली व्यंकट आणि दंडुगला लक्ष्मण यांना दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती, ही शिक्षा नंतर जन्मठेपेत वाढवण्यात आली.
हत्या झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी २०१३ मध्ये नेपाळमध्ये माफी दिल्यानंतर या लोकांना सोडण्याचे प्रयत्न सुरू झाले. दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासाचा हस्तक्षेप आणि कायदेशीर प्रयत्न आणि अपील असूनही, २०२३ मध्ये केवळ दंडुगला लक्ष्मणची सुटका झाली.
जानेवारी २०२४ मध्ये रवी, मल्लेश आणि हणमंतू यांना सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. भारतीय वाणिज्य दूतावासाने तातडीचे प्रमाणपत्र देऊन त्याच्या परतीची व्यवस्था केली आणि ते २१ फेब्रुवारीला भारतात परतले.
नामपल्ली व्यंकटची सुटका याचिका प्रलंबित असल्याने अजूनही तुरुंगात आहे. वाणिज्य दूतावास त्याला सुटकेसाठी स्वतंत्र याचिका दाखल करण्यात मदत करत आहे.