मुंबई – अभिनेत्री श्रीदेवीच्या निधनानंतर तिची कन्या जान्हवी कपूरबरोबरचे नाते बदलून गेले आहे, असे जान्हवीचा सावत्र भाऊ अर्जुन कपूरने म्हटले आहे. पूर्वी आम्ही भेटायचो. मात्र तेंव्हा आमच्या त्यामध्ये एकप्रकारचा तणाव होता.
आम्ही एकमेकांशी फारच कमी बोलायचो. मात्र आता सगळे बदलले आहे, असे अर्जुन कपूर म्हणाला. तर जान्हवीनेही अर्जुनबरोबरचे नाते खूप बदलले असल्याचे सांगितले. आमचे एकच कुटुंब आहे. आमचे वडील एकच आहे. आमच्या धमन्यांमध्ये एकच रक्त वाहते आहे. त्यामुळे आम्हाला कोणीही वेगळे करू शकत नाही, असे ती म्हणाली.
असे असले तरी आम्ही अजूनही वेगळे राहतो आहोत. मात्र आता सगळ्या गोष्टी सर्वसामान्य करण्याचा प्रयत्न करत आहोत, ही गोष्ट देखील अर्जुन कपूरने मान्य केली आहे. अर्जुन, अंशुला आणि जान्हवी, खुशी कधी नव्हे ते आता बऱ्यापैकी एकत्र यायला लागले आहेत.
मात्र अजूनही त्यांच्यातील बॉन्ड म्हणावा तेवढा डेव्हलप होऊ शकलेला नाही. जान्हवी आणि अर्जुन दोघेही सावत्र भाऊ बहीण असले तरी त्यांच्यातील नाते सख्ख्या भावाबहिणीसारखे व्हायला आता सुरुवात झाली आहे, एवढे तरी म्हणता येऊ शकेल.