दोन एसआयटी स्थापन; मृतांची संख्या ४२ वर
नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी देशाच्या राजधानीतील हिंसाचाराचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवला आहे. त्याशिवाय, तपासाला गती देण्यासाठी दोन विशेष तपास पथकांची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. दिल्ली हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ४२ इतकी झाली आहे.
यातच पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ईशान्य भागात दंगेखोरांनी हिंसाचारात केलेल्या नुकसानीची वसुली त्यांच्याकडूनच करण्याचा निर्णय दिल्ली पोलिसांनी घेतला आहे. विशेष म्हणजे यासाठी दंगेखोरांची ओळख पटवता यावी, यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांची मदत घेण्यात येणार आहे. समाजकंटकांनी सार्वजनिक आणि वैयक्तिक मालमत्तेच्या केलेल्या नुकसानीची, लुटमारीची भरपाई त्यांच्याकडूनच केली जाणार आहे. यासाठी दंगलखोरांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. जर ते दंड भरण्यास पात्र नसतील तर त्यांच्या मालमत्ता जप्त करण्यात येतील.
अगदी बरोबर