मेलबर्न : श्रीलंकेने चमारी अटापटटु आणि कविषा दिलहारी यांच्या फलंदाजीच्या जोरावर टी-२० क्रिकेट महिला विश्वचषक स्पर्धेच्या साखळी सामन्यात भारतीय संघासमोर विजयासाठी ११४ धावांचे आव्हान ठेवले आहे.
An excellent bowling performance from India to limit Sri Lanka to 113/9 👏
That is 22 runs more than New Zealand defended earlier however…#T20WorldCup | #INDvSL
📝📽️ https://t.co/pRG3mR1qkU pic.twitter.com/pHwOFvCMQB
— T20 World Cup (@T20WorldCup) February 29, 2020
श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली होती. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने चमारी अटापटटुच्या ३३(२४), शशीकला सिरिवर्देनेच्या १३(१२),हर्षिता मादवीच्या १२(१७) आणि कविषा दिलहारीच्या नाबाद २५(१६) धावांच्या खेळीच्या जोरावर २० षटकांत ९ बाद ११३ धावा केल्या.
भारतीय संघाकडून गोलंदाजीत राधा यादवने ४ षटकात २३ धावा देत सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. राजेश्वरी गायकवाडने २ तर दिप्ती शर्मा, शिखा पांडे आणि पूनम यादवने प्रत्येकी १ विकेट घेतली.