14 जिल्ह्यांमध्ये दैनंदिन रुग्णांची संख्या शून्य
पुणे – करोनाच्या पहिल्या लाटेपासून वाढत असलेल्या करोना बाधितांची संख्या कमी होण्याला सुरुवात झाली असून, सोमवारी सर्वात कमी बाधितांची नोंद राज्यात झाली आहे. याशिवाय राज्यात मुंबई, ठाणे, पुणे, रत्नागिरी वगळता एकाही जिल्ह्यात एकही मृत्यू नाही हीदेखील आनंदाची गोष्ट आहे.
गेल्या 24 तासांत 889 नव्या बाधितांची नोंद झाली असून, 12 बाधितांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 1 हजार 586 रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या 20 महिन्यांपासून करोनाचा हाहा:कार संपूर्ण राज्यात आहे. मृतांची संख्या 1 लाख 40 हजारांपेक्षा जास्त झाली आहे.
मात्र दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर करोना बाधितांची संख्या कमी होणे ही दिलासादायक बाब आहे. आणखी एक “टेन्शन फ्री’ बाब म्हणजे, 14 जिल्ह्यामध्ये दैनंदिन रुग्णांची संख्या शून्य आहे. याशिवाय, 12 जिल्ह्यांमध्ये दैनंदिन रुग्णसंख्या एक अंकीच आहे.