नवी दिल्ली – देशभरात गेल्या 24 तासात 50 हजारापेक्षा कमी नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. 15 ऑक्टोबरपासून दिवसभरातील नवीन रुग्णांची संख्या टप्प्याटप्प्याने कमी होत आहे. नवीन रुग्णांपेक्षा बरे होण्याचा रुग्णदरही कायम ठेवला गेला आहे. काल दिवसभरात 49 हजारापेक्षा अधिक रुग्ण गेल्या बरे झाले आहेत. हाच दर आज सलग 37 व्या दिवशी नोंदविला गेला आहे. सध्या देशात 5.12 लाख सक्रिय रुग्ण आहेत.
ही संख्या भारतातील एकूण रुग्णसंख्येपैकी केवळ 6.03 टक्के संख्येचा समावेश आहे, रुग्ण बरे होण्याचा दर 92 टक्के इतका आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या आणि सक्रिय रुग्ण संख्येतील अंतर सध्या 73 लाख 56 हजाराहून अधिक आहे. नव्याने बरे झालेले 76 टक्के रुग्ण 10 राज्यांमधील आहेत.
एकाच दिवसात मोठ्या संख्येने रुग्ण बरे होण्यामध्ये केरळने महाराष्ट्राची जागा घेतली आहे. केरळमध्ये गेल्या 24 तासात 7 हजार 120 रुग्ण बरे झाले आहेत तर महाराष्ट्रात 6,478 रुग्ण बरे झाले आहेत. केरळमध्ये गेल्या 24 तासात 7,201 रुग्णांची नोंद झाली आहे, तर जवळपास त्याच प्रकारे दिल्ली येथे 6,953 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर असून काल 3,959 नवीन रुग्ण संख्येची नोंद करण्यात आली आहे.गेल्या 24 तासात 559 मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. यापैकी 150 मृत्यूंची नोंद महाराष्ट्रातून झाली आहे. दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्ये अनुक्रमे 79 आणि 58 मृत्यूंची नोंद करण्यात आहे.