पंतप्रधानांना ममतांचा विरोध कायम
कोलकाता : आपण पंतप्रधानांशी चर्चा करायला तयार आहोत, पण त्यापुर्वी त्यांनी सुधारीत नागरीकत्व कायदा (का) मागे घ्यावा असे सांगत प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेला असणारा विरोध कायम ठेवला.
काश्मिर आणि काचा निर्णय घेण्यापुवी पंतप्रधानांनी आणि केंद्र सरकारने सर्व पक्षीय बैठकही बोलावली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चेला तयार आहेत, ही चांगली गोष्ट आहे. मात्र त्यापुर्वी त्यांन का कायदा मागे घ्यायला हवा. असे निर्णय घेण्यापुर्वी त्यांनी सर्वपक्षीय बैठक न घेणे देशासाठी हानीकारक आहे, ासे त्या म्हणाल्या.
आम्हाला एकसंघ भारत एकसंघ बंगाल हवा आहे. आम्हाला का, एनआरसी, एनपीआर नको आहेत, असे त्या म्हणाल्या. सोमावारी का कायद्याला विरोध करणारा ठराव प. बंगाल विधानसभेने मंजूर केला. असा ठराव करणारे ते चौथे राज्य ठरले आहे.