नवी दिल्ली – जगात सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून भारताची ओळख आहे. जितक्या झपाट्याने भारताची लोकसंख्या वाढत आहे, तितक्याच झपाट्याने प्रजनन दरही घट आहे. यामुळे भारतासाठी ही अत्यंत चिंतेची बाब ठरत आहे. याबाबत लॅन्सेट या जगप्रसिद्ध जर्नलमध्ये अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालानुसार भारतातील प्रजनन दर म्हणजेच प्रति महिला जन्मदर कमी होत आहे.
प्रसिद्ध द लॅन्सेट जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, भारतातील प्रजनन दर 1950 मध्ये म्हणजे सुमारे 74 वर्षांपूर्वी 6.2 होता, जो 2021 पर्यंत 2 पेक्षा कमी झाला आहे. 2050 पर्यंत त्यात आणखी घट होण्याची अपेक्षा आहे, जी भविष्यातही चिंतेची बाब असू शकते.
हवालानुसार, 2050 पर्यंत प्रजनन दर 1.29 असेल आणि 2100 मध्ये हा दर 1.04 पर्यंत कमी होऊ शकतो. अहवालानुसार, 1950 मध्ये भारतात 1.6 कोटींहून अधिक मुलांचा जन्म झाला. तर वर्ष 2021 मध्ये 2.2 कोटींहून अधिक मुलांचा जन्म झाला, ही संख्या 2050 पर्यंत 1.3 कोटीपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे.
अहवालात दिलेली आकडेवारी जागतिक ट्रेंडशी सुसंगत आहे. जागतिक स्तरावर, 1950 मध्ये प्रति महिला प्रजनन दर 4.8 मुलांपेक्षा जास्त होता. सन 2021 मध्ये, ते प्रति बालक 2.2 पर्यंत कमी होईल आणि अंदाजानुसार, 2050 पर्यंत जागतिक प्रजनन दर 1.8 पर्यंत खाली येईल आणि 2100 पर्यंत तो 1.6 वर पोहोचेल.
लॅन्सेटच्या अभ्यास अहवालानुसार, येत्या काही दशकांत भारताची लोकसंख्या लक्षणीयरित्या कमी होऊ शकते असं म्हटलंय. आणि जर हे सत्य असेल तर देशाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते, असे जाणकारांचे मत आहे. या आव्हानांमध्ये वृद्ध लोकसंख्या, कामगारांची कमतरता आणि लैंगिक भेदभावामुळे सामाजिक असंतुलन यांचा समावेश होतो.
2050पर्यंत अनेक आव्हाने?
भारतात 1950 मध्ये 1.6 कोटी मुलांचा जन्म झाला होता, तर 2021 मध्ये 2.2 कोटींहून अधिक मुलांचा जन्म झाला आहे. तो 2050 मध्ये 1.3 कोटीपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आगामी काळात देशाची लोकसंख्या वाढणार आहे.
देशाच्या सतत कमी होत असलेल्या लोकसंख्येमुळे त्याचा देशावर परिणाम होणार आहे, त्यामुळे देशाच्या लोकसंख्येचा समतोल बिघडणार असल्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केलीय.