मुंबई – येथील बांद्रा-कुर्ला काॅंप्लेक्समधील शरद पवार स्टेडियमवर सुरु असलेल्या रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात तामिळनाडुविरुद्ध खेळताना मुंबईने झुंजार फलंदाजीचे दर्शन घडवत पहिल्या डावात २०९ धावांची आघाडी घेतली असून, अजून त्यांचाएक गडी बाद व्हावयाचा आहे. मुंबईच्या डावात नवव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या शार्दूल ठाकूरने १०५ चेंडूंत १३ चौकार आणि ४ षटकार लगावत केलेल्या १०९ धावा अतिशय मोलाच्या ठरल्या.
ठाकूरच्या झंझावातापूर्वी, कालच्या २ बाद ४५ धावसंख्येवरुन पुढे खेळताना मधल्या फळीतील फलंदाज मुशीर खानने ६ चौकारांसह ५५ धावा करत संघाच्या डावाला आकार दिला. यष्टीरक्षक हार्दीक तामोरेने ३५ धावा करत त्यात भरच घातली. विशेष उल्लेखनीय खेळी ठरली ती शार्दूल ठाकूरला साथ देततासलेल्या तनुष कोटियानची. तनुषने आपल्या खेळीतमध्ये १० चौकारांसह ७४ धावा ठोकल्या असून अजूनही तो नाबाद आहे. तुषार देशपांडे १७ धावांवर त्याला साथ देत आहे.
शार्दूलने तामोरेच्या साथीत १०५ (१३१ चेंडू) आणि कोटियानच्य साथीत ७९ (९६ चेंडू) अशा उल्लेखनीय पार्टनरशिप्स केल्या. नंतर देशपांडे आणि कोटियान यांनी ८८ चेंडूंत ६३ धावांची नाबाद भागिदारी केली आहे. तामिळनाडुकडून साई किशोरने ९७ धावांत ६ विकेट्स घेतल्या. तर कुलदीप सेनने ६५ धावांत २ विकेट्स घेतल्या.