अगरतळा : मनोज इंगळेच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर महाराष्ट्राने रणजी ट्राफी स्पर्धेतील सातव्या फेरीच्या सामन्यात त्रिपुराला पहिल्या डावात १२१ धावांत गुंडाळले. त्यानंतर महापाष्ट्राने पहिल्या डावात फलंदाजी करताना पहिल्या दिवसअखेर ५ बाद १२७ अशी मजल मारली असून ६ धावांची आघाडी घेतली आहे.
Stumps Day 1: Maharashtra – 127/5 in 36.6 overs (V V More 30 off 57, A R Bawane 39 off 54) #TPAvMAH @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 27, 2020
महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारताना त्रिपुरास प्रथम फलंदाजीस पाचरण केले होते, मात्र महाराष्ट्राच्या गोलंदाजीसमोर त्रिपुराचा पहिला डाव ३८ षटकांत १२१ धावसंख्येवर संपुष्टात आला. त्रिपुराकडून मुरा सिंगने २४,राना दत्ताने २१ आणि मिंलिदने २० धावा केल्या तर महाराष्ट्राकडून गोलंदाजीत मनोज इंगळेने ३४ धावा देत सर्वाधिक ६ तर पालकरने ४९ धावा देत २ आणि गुगळेने १ धाव देत २ गडी बाद केले.
End Innings: Tripura – 121/10 in 37.6 overs (Rana Datta 21 off 52, A S Sarkar 1 off 2) #TPAvMAH @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 27, 2020
महाराष्ट्राने पहिल्या डावात पहिल्या दिवसअखेर ५ बाद १२७ धावा केल्या आहेत. एस एम गुगळे ३४ धावांची खेळी केली तर ए के काळे, अझीम काझी, जे एस पांडे शुन्यावर बाद झाले. त्रिपुराकडून मूरा सिंगने ३ तर राना दत्ता आणि ए एस सरकारने प्रत्येकी १ गडी बाद केला. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा अंकित बावणे ३९ आणि विशांत मोरे ३० धावांवर खेळत होता.