रांजणगाव गणपती -रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन व उद्योजक विलास पाचर्णे यांच्या साह्याने अनेक कामगारांना दोन वेळचे जेवण व निवारा मिळाला असल्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी सांगितले.
करोनामुळे बेघर आणि हातात काम नसणाऱ्या बऱ्याच कामगारांना आपल्या घराकडे जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही. रस्त्यावर असणाऱ्यांना पोलीस ताब्यात घेत आहेत.
असेच काही परप्रांतीय लोक पुणे परिसर व चाकण मधून पुणे नगर रस्त्याने पायी चालत जात असताना त्यांना रांजणगाव ते शिरूरमध्ये थांबवून त्यांची व्यवस्था करण्यासाठी विचारणा केली असता आपण त्यांची सद्गुरु प्लाझा येथे निवास व खान्या पिण्याची व्यवस्था केली असल्याचे विलास पाचर्णे यांनी सांगितले. दरम्यान, अनेक कर्मचारी निघून गेले आहे. तर ज्यांना जाता आले नसल्याने त्यांचे हाल होत होते.