नवी दिल्ली : भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संस्थेच्या (एएसआय) 2003 च्या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याच्या भूमिकेत मुस्लिम पक्षांनी गुरुवारी बदल केला आणि अयोध्येतील वादग्रस्त जमिनीच्या सुनावणी प्रकरणी न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याबद्दल माफी मागितली. पुरातत्व विभागाच्या अहवालावर प्रश्न उपस्थित करू इच्छित नसल्याचे मुस्लिम पक्षांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील राजीव धवन यांनी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाला सांगितले.
“अहवालाच्या प्रत्येक पृष्ठावर स्वाक्षरी असणे अपेक्षित नाही. अहवालाचे लेखन व सारांश यावर प्रश्न विचारण्याची गरज नाही. जर आम्ही न्यायालयाचा वेळ वाया घालवला असेल तर त्याबद्दल दिलगीर आहोत.’ असे ऍड. धवन यांनी न्यायालयात सांगितले. करण्यास परवानगी दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.