मुंबई : रिझर्व्ह बॅंकेने मुंबईतील पंजाब आणि महाराष्ट्र बॅंकेतील ठेवीदारांना रक्कम काढण्याच्या मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार आता सहा महिन्यात टकदा किंवा टप्प्याने दहा हजार रुपये काढता येणार आहेत. यापुर्वी हे निर्बंध केवळ 1 हजार रुपयांसाठी होते. तर बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालकाला निलंबित करण्यात आले आहे.
रिझर्व्ह बॅंकेच्या निर्बंधामुळे शेकडो खअतरदारांचे धाबे दणाणले होते. अनेकांनी आपल्या आयुष्याची पुंजी या बॅंकेत गुंतवली होती. मात्र, त्यावर निर्बंध आल्याने अनेकांना हाल अपेष्टांना सामोरे जावे लागत आहे. पंजाब आणि महाराष्ट्र को आप बॅंकेचे मॅनेजिंग डायरेकटर जॉय थॉमस यांना बॅंकेने निलंबित केले आहे. रिझर्व्ह बॅंकेमार्फत नियुक्त प्रशासकांनी थॉमस यांना निलंबित केले.