जम्मू – सशस्त्र दलांमध्ये समन्वय वाढविण्यासाठी तिन्ही दलांचे एक संयुक्त कमांडची स्थापना करण्याची घोषणा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी केली.जम्मू काश्मीर पीपल्स फोरमतर्फे भारतीय सशस्त्र दलातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
कारगील युद्धाचा अनुभव लक्षात घेऊन सरकारने हा संयुक्त कमांडचा निर्णय घेतला आहे असे ते म्हणाले.कारगिल शहीदांना श्रद्धांजली वाहताना संरक्षण मंत्री म्हणाले की, देशाची प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी त्यांचे सर्वोच्च बलिदान देश विसरु शकत नाही.
संरक्षण उत्पादनाचा संदर्भ देत राजनाथ सिंह म्हणाले, “भारत हा जगातील संरक्षण उत्पादनांचा सर्वात मोठा आयातदार देश होता. पण आज भारत हा संरक्षण सामग्री निर्यात करणाऱ्या महत्वाच्या देशांमध्ये सामिल झाला आहे असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
संरक्षण मंत्री म्हणाले की, देशाने आत्तापर्यंत 13,000 कोटी रुपयांची संरक्षण निर्यात केली आहे आणि 2025-26 पर्यंत ती 35,000 ते 40,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य आहे.