शेड्यूल्ड बॅंकेचा लवकरच दर्जा देण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न – अध्यक्ष राजेंद्र वाळुंज
91 वी वार्षिक सर्वसाधारण सभा चार तास चालली
राजगुरूनगर – राजगुरूनगर सहकारी बॅंकेची आर्थिक घोडदौड कायम असून नजीकच्या काळात बॅंकेला शेड्यूल्ड बॅंकेचा दर्जा देण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न असल्याचे मत बॅंकेचे अध्यक्ष राजेंद्र वाळुंज यांनी व्यक्त केले.
राजगुरूनगर सहकारी बॅंकेची 91 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि. 18) चंद्रमा मंगल कार्यालयात पार पडली. यावेळी सभासदांना मार्गदर्शन करताना वाळुंज बोलत होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार तास झालेल्या या सभेत विविध विषयांवर गरमागरम चर्चा झाली. ज्येष्ठ सभासद, संचालक मंडळाच्या प्रतिनिधींनी दीपप्रज्वलन करून सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली.
मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम वाकचौरे यांनी मागील ऑनलाइन सभेचे अहवाल वाचन केले. या सभेला उपाध्यक्ष अरुण थिगळे, किरण आहेर, गणेश थिगळे, दिनेश ओसवाल, किरण मांजरे, राहुल तांबे पाटील, सागर पाटोळे,विजयाताई शिंदे, हेमलता टाकळकर, परेश खांगटे, एड डी के गोरे, धनंजय कहाणे, सतीश नाईकरे, ऍड. सुरेश कौदरे, ऍड. धर्मेंद्र खांडरे, गौतम कोतवाल, के. डी. गारगोटे, सरव्यवस्थापक संजय ससाणे, वसुली अधिकारी सम्राट सुपेकर, अमृत टाकळकर, मनजीत महिंदर, अंकुश कोहिनकर, बाळासाहेब घोलप, गायत्री बेरी यांच्यासह बॅंकेचे अधिकारी आणि मोठ्या संख्येने बॅंकेचे सभासद उपस्थित होते.
सभासदांनी विनातारण कर्ज व थकबाकी, आयडियल ओव्हर ड्यु संदर्भात होणाऱ्या कर्ज कारवाई, बॅंकेच्या 17 शाखा असुन त्यातील किती शाखा तोट्यात आहेत? सभासदांना लाभांश वाटप झाला नाही. 15 टक्के लाभांश सभासदांना द्यावा, बॅंकेचे कायदेशीर सल्लागार बदलणे, व्यक्तिगत संबंधावर कर्ज प्रकरणे, चाकण एमआयडीसी परिसरातील कुरुळी येथे बॅंकेची शाखा सुरू करावी, मोठ्या व नियमित कर्जदारांना व्याज सवलत. आदी विषयांवर साधक बाधक चर्चा झाली. बॅंकेच्या एक दोन सभासदांनी प्रशनोत्तरसाठी मोठा वेळ घेतला. त्यामुळे कामकाज तब्बल चार तास चालले. मुख्य कार्यकारी आधिकारी शांताराम वाकचौरे ,अध्यक्ष राजेंद्र वाळुंज यांनी सभासदांच्या प्रश्नावर समर्पक उत्तर दिले.
आरबीआय यानिर्देशामुळे टॉप 50 थकीत कर्जदारांची यादी करून दर महिन्याला संचालकांच्या सभेत कारवाईबाबत चर्चा केली जाते. बॅंकेत 864 कर्जप्रकरणे प्रलंबित असून त्यापैकी 114 कर्ज प्रकरणे बंद झाली आहेत त्यापोटी 7 कोटी रुपये वसूल झाले आहेत. उर्वरित 740 कर्ज प्रकरणाबाबत बॅंकेच्या वसुली विभागाची कारवाई सुरू आहे.आरबीआयचे निर्बंध आणि नियमावली नुसार बॅंकेचे कामकाज केले जात आह.
-शांताराम वाकचौरी, मुख्य अधिकारी, राजगुरूनगर सहकारी बॅंक