राजगुरूनगर – “आजादी का अमृत महोत्सव” या अभियानांतर्गत येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्यावतीने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.
राजगुरूनगर येथील हुतात्मा सृतिशिल्पातील क्रांतिवीर हुतात्मा भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एम. अंबाळकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन रॅलीची सुरुवात करण्यात आली.
यावेळी न्यायाधीश डी.व्ही. कश्यप, एस. एन. पाटील, जिल्हा न्यायाधीश वरिष्ठस्तर एस. एस. पाखले, के. एच. पाटील, जी. बी. देशमुख, दिवाणी न्यायाधिश आर. डी. पतंगे, डी. बी. पतंगे, पी. ए. जगदाळे, एन. एस. कदम, सरसेनापती हंबीरराव मोहिते विधी महाविद्यालयाचे प्राचार्य किरण शिंदे, बार असोसिएशनचे अध्यक्ष देविदास शिंदे, अॅड गणेश गाडे, अॅड रिना मंडलिक,अॅड संदीप गाडे,अॅड संदीप मलगे, अॅड माणिक वायाळ, अॅड उज्वाला माळी अॅड शुभम गाडगे, अॅड तिलोत्तमा राऊत, अॅड सोनाली पडवळ ,अॅड स्नेहल पवळे ,ज्येष्ठ विधिज्ञ अॅड माणिक पाटोळे ,अॅड अरुण मुळूक ,अॅड निलेश आंधळे ,अॅड प्रवीण पडवळ ,अॅड अतिक सय्यद,अॅड संदीप दरेकर, विधी महाविद्यालयाच्या प्रा. राणी चव्हाण यांच्यासह विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी, बार असोसिएशनचे वकील सभासद उपस्थित होते.
“आजादी का अमृतमहोत्सव अभियानातंर्गत “खेड तालुक्यांमध्ये दि.२ ऑक्टोबर ते दिनांक १४ नोव्हेंबर २०२१या कालावधीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कायदेविषयक शिबिरे आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
दरम्यान, जिल्हा न्यायालयात महात्मा गांधींच्याप्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. राजगुरूनगर शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड शुभम गाडगे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड देवदास शिंदे यांनी केले.