जयपूर – राजस्थानमध्ये मंगळवारी घडलेल्या भीषण अपघातात एकाच कुटूंबातील 11 जण मृत्युमुखी पडले. त्या अपघातात इतर 7 जण जखमी झाले. एका कुटूंबातील सदस्यांसह काही प्रवासी बसलेल्या पिक-अप जीपने झुंझुनूमध्ये रस्त्यालगत पार्क केलेल्या ट्रॅक्टर-ट्रेलरला जोरदार धडक दिली.
त्या धडकेनंतर पिक-अप जीप उलटली. त्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांत काही महिलांचा आणि मुलांचाही समावेश आहे. अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दु:ख व्यक्त केले. मोदींनी मृतांच्या कुटूंबीयांना प्रत्येकी 2 लाख रूपयांची मदतही जाहीर केली.