मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जोरदार राजकीय हालचाली सुरु आहेत. अश्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नुकतंच मुंबईतील गोरेगावमधील नेस्को मैदानावर पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता. या सभेत बोलताना राज ठाकरेंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नरेंद्र मोदी तसेच राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह अनेकांवर जोरदार हल्लाबोल केला. या सभेमधून त्यांनी चौफेर टोलेबाजी करत, मनसेच्या आंदोलनावरून पक्षावर निशाणा साधणाऱ्यांना राज ठाकरेंनी चांगलेच फैलावर घेतले.
दरम्यान, राज ठाकरेंच्या सभेनंतर महाराष्ट्रातील अनेक मोठ्या नेत्यांनी यावर आपली प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. अश्यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी “राज ठाकरे हे सुपारी घेऊन काम करतात’, असं आरोप केला आहे. ते रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी विनयक राऊत म्हणाले की, “मनसेने फक्त स्वप्न पहावी, अस्तित्व नाही. निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे सुपारी घेऊन काम करतात’ असं राऊत म्हणाले आहेत. विनायक राऊत पुढे म्हणाले की, “राज ठाकरे फक्त नक्कल करुन राजकारण करत आहेत.
बाळासाहेबांचं नाव घेऊन उद्धव ठाकरे यांची नक्कल करायची. पायाला ठेच लागली तरी तुम्ही मुंबईला अॅडमिट होता. उद्धव ठाकरे यांचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर होतंय ही राज ठाकरे यांची पोटदुखी आहे.” असं देखील ते म्हणाले आहे.
राज ठाकरेंच्या भेटीनंतर रिक्षा संघटना…
पुण्यातील रिक्षचालकांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. बेकायदेशररित्या सुरू असलेल्या बाईक टॅक्सी विरोधात रिक्षा चालक यांचा असलेला लढा प्रशासनाने केलेला दिरंगाई पणा याबाबत देखील यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी राज ठाकरे यांनी रिक्षा संघटनांना मदतीचे आश्वासन दिलं आहे.