मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जोरदार राजकीय हालचाली सुरु आहेत. अश्यातच भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डाॅ. बाबासाहाबे आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले असल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यानंतर राज्यभर त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. यादरम्यान, पिंपरी चिंचवडमध्ये पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे.
घटनेनंतर शाईफेक करणाऱ्यांस पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तिथे उपस्थित ११ पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांवर राज्य शासनाने कर्तव्यात कसूर केल्याबद्दल निलंबनाची कारवाई केली होती. दरम्यान, या घटनेनंतर अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
‘पोलिसांना हा प्रकार रोखता आला नाही हे मान्य पण निलंबनाची कारवाई म्हणजे सरकारचं टोकाचं पाऊल आहे’, अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या होत्या. यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही हेच हेरुन थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावून आपलं म्हणणं सांगितलं.
गृहमंत्री फडणवीसांनीही राज ठाकरे यांचं म्हणणं विचारात घेऊन निलंबित करण्यात आलेल्या पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांवरची निलंबनाची कारवाई मागे घेत असल्याचा शब्द राज ठाकरे यांना दिला. याबद्दलचे एक पत्रक देखील राज ठाकरेंनी सोशल मीडियावर शेअर केले होते. ‘पोलिसांचं निलंबन मागे घेऊन त्यांना तात्काळ सेवेत घ्यावे’, अशी विनंती राज ठाकरे यांनी या केली होती.
राज ठाकरे म्हणाले, “ज्येष्ठ भाजप नेते चंद्रकांत पाटील ह्यांच्यावरचं शाईफेक प्रकरण, पोलिसांचं निलंबन, कार्यकर्त्यावर लावलेला मनुष्यवधाचा गुन्हा ह्या सर्व प्रकरणात मी मध्यस्थी करावी अशी इच्छा सर्वपक्षीय शिष्टमंडळाने माझ्याकडे व्यक्त केली. माझ्या यशस्वी मध्यस्थीनंतर ह्या प्रकरणावर माझीे भूमिका’. असं ते म्हणाले.