Rahul Gandhi on voting । लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झालीय. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांचे नेतेही मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनीही मतदानाबाबत जनतेला विशेष आवाहन केलंय.
राहुल गांधी यांनी ट्विटरवर मतदानासंदर्भात एक पोस्ट केलीय. यात, “आज मतदानाचा पहिला टप्पा आहे! लक्षात ठेवा, तुमचे प्रत्येक मत भारताच्या लोकशाहीचे आणि भावी पिढ्यांचे भवितव्य ठरवणार आहे. त्यामुळे बाहेर पडा आणि गेल्या 10 वर्षात देशाच्या आत्म्याला दिलेल्या जखमांवर आपला ‘मताचा मलम’ लावून लोकशाही मजबूत करा. द्वेषाचा पराभव करा आणि प्रत्येक कोपऱ्यात ‘प्रेमाची दुकाने’ उघडा.” असे आवाहन केले.
असे केले मल्लिकार्जुन खर्गे यांनी आवाहन Rahul Gandhi on voting ।
तर दुसरीकडे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी जनतेला विशेष आवाहन केले. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, आजपासून आपली राज्यघटना आणि लोकशाहीच्या रक्षणाची लढाई सुरू होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदान करणाऱ्या 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील माझ्या प्रिय नागरिकांनो, मी तुम्हाला तुमचा मत द्या आणि काळजीपूर्वक मतदान करा अशी विनंती करतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांवर अधिक भर दिला Rahul Gandhi on voting ।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले. त्यांनी ट्विटरवर लिहिले, “लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आजपासून सुरू होत आहे! लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 102 जागांसाठी मतदान होणार आहे. या सर्व जागांच्या मतदारांना मी आवाहन करतो की त्यांनी मतदानाचा हक्क बजावून मतदानाचा नवा विक्रम निर्माण करावा. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या माझ्या तरुण मित्रांना माझे विशेष आवाहन आहे की त्यांनी मोठ्या संख्येने मतदान करावे. लोकशाहीत प्रत्येक मत मौल्यवान असते आणि प्रत्येक आवाजाला महत्त्व असते.
हेही वाचा
देशात लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात ; पंतप्रधानांकडून खास मराठीतून आवाहन