Rahul Gandhi on BJP। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची सध्या भारत जोडो न्याय यात्रा सुरु आहे. त्यांची ही यात्रा सध्या छत्तीसगढमध्ये दाखल झालीय. छत्तीसगढमधून राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला. भाजपच्या हिंदू राष्ट्राच्या व्याख्येत दलित, मागास समाजाचा समावेश नाही, असा आरोप त्यांनी केला.
नोटबंदीने छोटे व्यापारी देशोधडीला Rahul Gandhi on BJP।
राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ मणिपूरपासून सुरू होऊन मुंबईत संपणार आहे. हा प्रवास बिहार, झारखंड, ओडिशा मार्गे छत्तीसगडमध्ये पोहोचला आहे. भाजप सरकारने नोटाबंदी केली आणि त्यानंतर जीएसटी लागू करण्यात आला. सरकारच्या या निर्णयांमुळे छोटे व्यापारी देशोधडीला लागले,असा आरोप त्यांनी केला.
संपूर्ण यंत्रणा तीन-चार लोकांसाठी Rahul Gandhi on BJP।
प्रत्येक क्षेत्र काही लोकांमध्ये विभागले जात असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. सत्ता, संरक्षण, आरोग्य, रिटेल, विमानतळ… देशातील कोणत्याही उद्योगात निवडक लोक असतात. याचा अर्थ संपूर्ण यंत्रणा तीन-चार लोकांसाठी चालवली जातीय. बाकीची जनता महागाईने दडपली जात आहे. हा आर्थिक अन्याय आहे.
सामाजिक न्यायाच्या मुद्द्यावर सरकारला कोंडीत पकडले
” देशात मागासवर्गीयांची संख्या 50 टक्के, दलित 16 टक्के आणि दलित 8 टक्के आहेत. त्यांचा कष्टाचा सगळा पैसा भांडवलदारांच्या कंपन्यांमध्ये जात आहे. तर त्यांच्या कंपन्यांमध्ये दलित आणि मागासलेले लोक नाहीत. देशातील विविध क्षेत्रात दलित आणि मागासवर्गीयांचा सहभाग नसल्याचे राहुल म्हणाले. भाजप हिंदु राष्ट्राविषयी बोलतो, तर मागासवर्गीय, दलित, आदिवासी समाजाला काहीच मिळत नाही. राम मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळीही एकही गरीब-मजूर शेतकरी दिसला नाही.