Farmers Protest । Rahul Gandhi – दिल्ली सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी राहुल गांधी दिल्लीत आल्याने त्यांच्या झारखंडमधील ‘भारत जोडो न्याय यात्रे’चा दुसरा टप्पा, जो बुधवारी सुरू होणार होता, तो रद्द करण्यात आला आहे, असे पक्षाच्या एका नेत्याने सांगितले. दरम्यान राहुल गांधी यांनी आज पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत जखमी झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. राहुल गांधी जयपुरमध्ये सोनिया गांधी यांचा राज्यसभा उमेदवारीचा अर्ज दाखल करतानाही तिथे उपस्थित राहिले होते. | Farmers Protest । Rahul Gandhi
भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधी झारखंडमधील गढवा जिल्ह्यातील रांका येथे मनरेगा कामगारांशी संवाद साधणार होते, तो संवाद आता ज्येष्ठ काँग्रेस नेते जयराम रमेश आणि पक्षाचे इतर नेते साधणार आहेत. राहुल गांधी बुधवारी छत्तीसगडमधून गढवा जिल्ह्यातून झारखंडमध्ये त्यांच्या यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पुन्हा प्रवेश करणार होते.
मंगळवारी रात्री उशिरा घेतलेल्या निर्णयानुसार झारखंडमध्ये भारत जोडो न्याय यात्रेचे बाकी सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, असे काँग्रेसच्या प्रवक्त्या सोनल शांती यांनी पीटीआयला सांगितले. | Farmers Protest । Rahul Gandhi
झारखंड काँग्रेसचे अध्यक्ष राजेश ठाकूर, झारखंडचे प्रभारी गुलाम अहमद मीर, एनएसयूआयचे प्रभारी कन्हैया कुमार आणि काँग्रेसचे इतर वरिष्ठ नेते आता बुधवारी रांका येथे मनरेगा कामगारांशी नियोजित संवादात सहभागी होतील, असे त्यांनी सांगितले. १५ फेब्रुवारीला बिहारमध्ये प्रवेश करण्यापूर्वी गांधी दुसऱ्या टप्प्यात दोन दिवस झारखंडमध्ये राहणार होते.
Paytm Payments Bank : पेटीएमच्या अडचणीत वाढ; मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू
Milind Devara | शिंदे गटाकडून मिलिंद देवरांना राज्यसभेची लॉटरी