Rahul Gandhi : छत्तीसगड विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी आज राज्यातील बस्तर जिल्ह्यातील जगदलपूर याठिकाणी सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर हल्लाबोल करताना,”भाजप नेते आदिवासींना वनवासी म्हणतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि आरएसएसच्या लोकांनी नवा शब्द काढला आहे, तो म्हणजे ‘वनवासी’ आणि तो शब्द आदिवासी लोकांसाठी वापरण्यात येत आहे. त्यासोबतच ते माणसांना जनावरासारखे वागणूक देतात असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी,”आदिवासी आणि वनवासी यांच्यात खूप फरक आहे. नुकताच एक व्हिडिओही व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एका आदिवासी व्यक्तीने कोणावर तरी लघुशंका केली आणि नंतर तो व्हायरल झाला. लघुशंका करणारी व्यक्ती भाजप नेता होती. भाजपचे नेते आदिवासींना जनावरांपेक्षाही वाईट समजतात, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळेच ते आदिवासींसाठी ‘वनवासी’ हा शब्द मुद्दाम वापरतात.
काँग्रेस नेत्याने आदिवासी या शब्दाचा अर्थही लोकांना समजावून सांगितला. ते म्हणाले की, आदिवासी म्हणजे देशाचा पहिला आणि खरा मालक. म्हणजे या देशाची जमीन आणि जंगले जी एकेकाळी तुमची होती, ती आज तुमच्यापासून हिरावून घेतली गेली आहेत. भाजप यावर कधीच बोलत नाही, कारण त्यांना हे सर्व तुम्हाला परत करावे लागेल, असे राहुल म्हणाले. म्हणूनच त्यांनी ‘वनवासी’ हा शब्द तयार केला आहे, जो जंगलात प्राण्यांप्रमाणे राहतो. हा शब्द अपमानास्पद आहे, काँग्रेसला तो मान्य नाही. असे त्यांनी यावेळी म्हटले.
राहुल गांधी यांनी यावेळी उद्योगपती गौतम अदानी यांच्याविषयी भाष्य केले. “देशातील सर्वात मोठे उद्योगपती आणि पंतप्रधान मोदींचे मित्र यांचा प्रकल्प आम्ही रद्द केला आहे. जनतेचे नुकसान आम्ही सहन करू शकत नाही. काँग्रेसमुळे आता पंतप्रधान मोदी वनवासी म्हणून बोलत नाहीत, ते आदिवासी म्हणून बोलतात पण विचार वनवासी म्हणून बोलतात. या देशात दररोज दलितांचा छळ होत आहे. ओबीसींचा अपमान केला जातो. पंतप्रधान म्हणतात की या देशात गरीबांची एकच जात आहे, मग तुम्ही स्वत:ला ओबीसी का म्हणता.? असा थेट सवाल त्यांनी येवेळी केला.