पुणे – परदेशांतून भारतात आलेल्या नागरिकांना आता 15 दिवसांचे “क्वारंटाइन’ बंधनकारक नाही. त्यामुळे आता डिसेंबर सुट्ट्यांत भारतात आलेल्या नागरिकांकडून करोनाचा प्रसार वाढू शकतो का, याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे.
दोन वर्षांपूर्वी भारतात करोना संसर्गाची सुरुवात परदेशांतून आलेल्यांमुळे सुरू झाली, ही वस्तुस्थिती आहे. अनेक देशांमध्ये ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात, त्या काळात परदेशात राहणारे भारतीय नागरिक, विद्यार्थी हे भारतात येतात. अशाच “ट्रॅव्हलिंग हिस्ट्री’ मधून करोनाने चंचूप्रवेश केला आणि संपूर्ण देश दोन वर्षे ढवळून निघाला. आताही डिसेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी येथे येण्याचे प्लॅनिंग केले आहे.
परंतु भारतात आल्यानंतर 15 दिवस क्वारंटाइन राहण्याचा नियम शिथिल करण्यात आल्याने आता हे नागरिक पहिल्या दिवसापासूनच मुक्तपणे संचार करू शकतात. दोन्ही डोस घेतलेल्यांना करोना होऊ शकतो. त्यामुळे परदेशांतून येणारे नागरिक याचे प्रसारक असू शकतात, याची दोन्ही डोस घेतले असतील आणि जर लक्षणे असतील तर त्यांची आरटी-पीसीआर टेस्ट केली जाते. जी बंधनकारक आहे. तपासणी केल्यानंतर ताप असेल तर त्याची टेस्ट करणे बंधनकारक आहे.
– डॉ. संजीव वावरे,
सहायक आयुक्त, आरोग्य विभाग, पुणे मनपा