अमोल बनकर
सासवड – पुरंदर तालुक्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी एसटीची लालपरी गेल्या अनेक वर्षांपासून तोट्याचा सामना करताना दिसत आहे. करोनाच्या काळामध्ये एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना आर्थिक फटका मोठ्या प्रमाणात बसला होता. त्यातच राज्यातील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसत काही दिवसापासून गतिमान असलेली लालपरी चाके थांबवण्याचा निर्णय संघटनांनी घेतला होता. लालपरीची संथगतीने का होईना. ग्रामीण भागातील प्रवाशांना गतिमान करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पुरंदर तालुक्यातील सासवड आगारामध्ये एसटी महामंडळाच्या 224 कर्मचारी होते. यापैकी वाहक 85 चालक 78 मेकॅनिक भाग 44 ताशा सतरा अशी कर्मचाऱ्यांची संख्या सासवड आगाराकडे आकडे उपलब्ध होते. यापैकी संपामध्ये सर्व 224 कर्मचारी सहभागी झाले होते. एसटी महामंडळाच्या संघटनांनी संप मागे घेतल्यानंतर हळूहळू कर्मचारी कामावर रुजू होत आहेत.
सासवड एसटी आगाराने आतापर्यंत 45 फेऱ्या सुरू केले आहेत. यामध्ये नाशिक, सोलापूर, पंढरपूर, बोरवली, दादर, कल्याण, औरंगाबाद, गोंदवले याठिकाणी फेऱ्या सुरू झाले आहेत. यासाठी कर्मचारी आपली ड्युटी बजावित असून आता ग्रामीण भागातील सासवड ते वीर सासवड ते सुपा या दोन फेऱ्या सुरू झाल्या आहेत. सासवड ते काळदरी, सासवड ते बहिरवाडी या दोन फेऱ्या रस्त्याचे काम सुरू असल्याने बंद आहेत. त्यादेखील दोन दिवसांत सुरू होणार असल्याची माहिती वरिष्ठ लिपिक पी. के. मोरे यांनी दिली.
सध्या सर्व कर्मचाऱ्यांचे निलंबन शासनाने मागे घेतले असल्याने सासवड एसटी आगारातील सर्व कर्मचारी कामावर हजर होत आहेत. त्यामुळे लवकरच फेऱ्यांची संख्या वाढणार आहेत. काही कर्मचारी हे वैद्यकीय रजेवर तर काही दिवसांत कर्मचारी निवृत्त होणार आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांचा संख्येचा अभाव जाणवणार आहे. गाड्या पाच महिन्यांपासून बंद असल्याने गाड्यांमध्ये बिघाड असण्याची शक्यता आहे. यामुळे कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडणार व एसटीच्या वाहनांची संख्या कमी पडणार आहे. यामुळे हे पूर्वपदावर येण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे.
सासवड आगारातून नाशिक, सोलापूर, पंढरपूर, बोरवली, दादर, कल्याण, औरंगाबाद, गोंदवले, तर ग्रामीण भागातील सुपे, वीर, अशा बस सुरु आहेत. यांचा फायदा प्रवासी यांनी घ्यावा.
– पी. के. मोरे, वरीष्ठ लिपिक, सासवड आगार.