मुंबई – गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सुरु असलेलं आत्महत्येचे सत्र काही केल्या थांबताना दिसत नाही.टीव्ही स्टार वैशाली ठक्करने देखील काल आपले जीवन असेच संपवून टाकले. अभिनेत्री वैशाली ठक्करच्या आत्महत्येनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. नेमकं तिने हे टोकाचे पाऊल का उचलले. यामागे काही षडयंत्र होते का ? अशा प्रश्नांची उत्तरे पोलीस देखील शोधत असताना त्यांना वैशालीच्या खोलीमध्ये तिने लिहिलेली डायरी सापडली ज्यामुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.
वैशालीने आपल्या डायरीमध्ये लिहिलेल्या काही गोष्टी समोर आल्या आहेत. तिचा शेजारी राहुल तिचा मानसिक छळ करत होता, असे डायरीत लिहिले आहे. इतकेच नाही तर राहुलसोबत त्याची पत्नी दिशाचे नावही डायरीत आहे. गेल्या अडीच वर्षांपासून दोघेही तिचा मानसिक छळ करत होते, असे अभिनेत्रीने आपल्या डायरीत लिहिले आहे.
याशिवाय डायरीत वैशालीने राहुल आणि दिशाला शिक्षा करण्याचेही म्हंटले आहे. अभिनेत्रीने लिहिले आहे की, हे दोघे अडीच वर्षांपासून तिचा मानसिक छळ करत आहेत. कृपया त्यांना शिक्षा करा नाहीतर माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही. या चिठ्ठीच्या आधारे इंदूर पोलिसांनी आरोपी राहुल आणि त्याच्या पत्नीला ताब्यात घेतले आहे.
यासोबतच टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्कर हिने आपल्या आई-वडिलांना पत्र लिहून आपल्या मनातील गोष्ट सांगितली आहे की,तिने यावेळी आई वडिलांची माफी मागितली आहे आणि त्यांना आनंदी रहा असे म्हंटले आहे. वैशालीने आपल्या एक्स बॉयफ्रेडवरून देखील परेशान असल्याचे डायरीतून समोर आले आहे.