मांजरी – मुख्य रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रिटीकरण कामातील अडथळे दूर करण्यात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) प्रशासनाला गेल्या पाच वर्षांतही यश आलेले नाही, यामुळेच दीड-दोन कि.मी. या रस्त्याचे काम रडतखडत सुरू आहे. मुळे नागरिकांची गैरसोय होत असून रस्त्याचे काम पूर्ण होण्यास आणखी दिवस वाट पाहावी लागणार, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
गोपाळपट्टी येतील रेल्वे उड्डाणपूल ते मुळामुठा नदीपर्यंतच्या सुमारे दीड-दोन कि.मी. रस्त्याचे काम ‘पीएमआरडी’ने पाच वर्षांपूर्वी सुरू केले हे काम पहिल्यापासूनच संथगतीने सुरू आहे. त्यातच रस्त्यात येणारे अतिक्रमण, विद्युत रोहित्र तसेच खांबांचे रखडलेले स्थलांतरामुळे यामुळे रस्त्याचे काम जागोजागी अर्धवट सोडून देण्यात आले आहे.
ठेकेदाराची मनमानी व ‘पीएमआरडीए’ प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे रस्त्याला कोणी वाली आहे की नाही, असा प्रश्न उपस्तित झाला आहे. प्रशासनातील विविध विभागांचा समन्वय नसल्याने जागोजागी काम अर्धवट व निकृष्ट स्वरूपाचे होत असून या कामात सलगता नसल्यामुळे ते दर्जाहीन होत आहे. काँक्रिटीकरणाच्या दोन सांध्यांमध्ये खड्डे पडले आहेत. कुठलेही फलक अतवा सिग्नल नाहीत, कामाच्या अथवा धोक्याच्या ठिकाणी पुरेशी सुरक्षितता नाही, ठेकेदार वारंवार बदलले जात आहेत, अधिकाऱ्यांकडून कामाची गुणवत्ता तपासणी होत नाही,
“रस्त्यात येणारी अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. विद्युत रोहित्र व खांब स्थलांतराचे काम अंतिम टप्प्यात आहे. महिन्याभरात रस्ता पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला होईल.” – विजय कांडगावे, कार्यकारी अभियंता, ‘पीएमआरडीए’
अपघाताचे वाढले प्रमाण
या रस्त्याच्या अर्धवट कामामुळे स्थानिक नागरिकांना दररोजची कसरत करावी लागत आहे. सध्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत, राडारोडा पडला आहे, सिमेंटच्या वाहिन्या, दुभाजकाचे सुटे भाग ठिकठिकाणी पडले आहेत. खडी, माती पसरली आहे. यातून दररोज छोटे-मोठे अपघात होत आहेत.