Shahrukh Khan – शाहरुख खान बॉलीवूडमधील टॉप कलाकारांपैकी एक आहे. त्याने चित्रपटांमध्ये अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या असून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. शाहरुख खानने आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक कलाकार आणि गायकांसोबत काम केले. गायक अभिजीत भट्टाचार्य त्यापैकीच एक अशात या गायकाने धक्कादायक खुलासा केला आहे.
अभिजीत भट्टाचार्य यांनी शाहरुखच्या अनेक चित्रपटांमध्ये आवाज दिला होता. ‘अंजाम’ चित्रपटातील ‘बडी मुश्किल है’, ‘येस बॉस’ चित्रपटातील ‘मैं कोई ऐसा गीत गाव’ आणि ‘मैं हूं ना’ चित्रपटातील ‘तुम्हे जो मैं देखा’ ही गाणी अभिजीतने गायली आहे. ‘बिल्लू’ हा शेवटचा चित्रपट होता ज्यात गायकाने शाहरुख खानला आवाज दिला होता. आता एका मुलाखतीत अभिजीत भट्टाचार्यने शाहरुख खानबद्दल बोलले आहे.
अभिजीतचे आणि शाहरुख खानचे व्यक्तिमत्त्व एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे आहेत. गायकाने सुपरस्टारची स्तुती केली आणि त्याला स्वयं-निर्मित माणूस म्हटले. तो म्हणाला की शाहरुखमध्ये स्वाभिमान आणि आत्मविश्वास दोन्ही आहे. अभिजीतच्या मते हा गुण त्याच्यातही आहे. ते म्हणाले, ‘आम्हाला ईगो नाही, पण स्वाभिमान आहे.’
सिंगरने सांगितले की, ‘मी आणि शाहरुख खानमधील व्यक्तिमत्त्वातील फरक दूर करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तो असेही म्हणाला की, शाहरुख खान हा एक अतिशय व्यावसायिक व्यक्ती आहे, जो इतर लोकांचा वापर करतो आणि त्याच्या यशाच्या मार्गात कोणालाही येऊ देत नाही.
त्याला देशद्रोही म्हणणे पूर्णपणे चुकीचे ठरेल. अनेकांनी यासाठी प्रयत्न केले, पण शाहरुख खानपेक्षा मोठा राष्ट्रवादी कोणीही नाही. ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’, ‘स्वदेस’, ‘अशोका’ त्यांनी बनवलेले चित्रपट बघा… त्याच्यावर असे आरोप कसे होऊ शकतात.’ असं म्हणत अभिजीतने त्याच्याबदल मत व्यक्त केलं.