– शहरातील ५६,६३८ जणांनी घेतला योजनांचा लाभ
पुणे – केंद्र शासनाच्या जनकल्याणकारी योजना घरोघरी पोहोचविण्यासाठी पुणे शहरात विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात येत असून आतापर्यंत शहरातील ५६ हजार ६३८ नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घेतला आहे.
विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधून विविध योजनांचा लाभ देण्यासाठी लाभार्थ्यांची नोंदणीदेखील करून घेण्यात येत आहे.
यात्रेत एकूण १ लाख ४७ हजार ४०८ नागरिकांनी सहभाग घेतला. ९ हजार ७९९ नागरिकांनी आधार कार्ड नोंदणीचा लाभ घेतला. २१ हजार ६३३ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली, तर ८ हजार २८० नागरिकांची आयुष्मान भारत कार्डसाठी नोंदणी करण्यात आली.
यात्रेदरम्यान ११ हजार १८४ नागरिकांनी उज्वला गॅस योजना तर ५ हजार ७४२ नागरिकांनी पंतप्रधान स्वनिधी योजनेचा लाभ घेतला. १० हजार ६०७ नागरिकांनी आत्मनिर्भर भारतासाठी सामूहिक शपथ घेतली. विकसित भारत संकल्प यात्रेत केंद्र शासनाच्या विविध योजनांचे स्टॉल लावण्यात येत असून नागरिकांना योजनांची माहिती देणारी पुस्तिकाही देण्यात येत आहे. हा उपक्रम पुणे शहरात २६ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.