पुणे –पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) प्रारुप विकास आराखडयावर (डीपी) आलेल्या हरकतींबर 14 मार्च 2022 पासून सुनावणी घेण्यात येत आहे. आतापर्यंत 18 नागरी विकसन केंद्रापैकी 9 नागरी विकसन केंद्रांमधील सुमारे 67 गावांमधील 16 हजार 442 नागरिकांना सुनावणीसाठी बोलविण्यात आले होते. त्यापैकी 90 टक्के म्हणजे 9 हजार 466 नागरिकांनी सुनावणीसाठी उपस्थिती लावली. पीएमआरडीएच्या हद्दीत सुमारे 814 गावांचा समावेश होता. या डीपीवर सुमारे 61 हजार हरकती आल्या आहेत. या हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी सात सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.