पुणे : पायी जाणाऱ्या दोन मुलांना कारने धडक दिली त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना कोंढवे गेट येथे गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. अजिंक्य केदार पाटील ( १७, रा. कोंढवे धावडे) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे तर मनिष तावरे (१७) असे जखमीचे नाव आहे. याबाबबत कारचालक अजिंक्य आघाडे याला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अजिंक्य पाटील आणि मनिष तावरे हे दोगे कोंढवे गेटसमोरील रस्त्यावरून चालत निघाले होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या लाल रंगाची मारुती ब्रिझा कारने (एमएस १२ व्ही व्ही ४१६३) त्यांना धडक दिली. त्यामध्ये अजिंक्य आणि मनिष गंभीर जखमी झाले.
मात्र, कारचालकाने तेथून पळ काढला. स्थानिक नागरिकांनी दोघा जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र उपचार सुरू असताना अजिंक्य पाटील याचा मृत्यू झाला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीच्या आधारे कारचा शोध घेतला तेव्हा लाल रंगाची मारुती ब्रिझा ही कार शिवणे येथील स्नेहाविहार सोसायटी येथे सापडली. त्याचा चालक अजिंक्य अरुण आघाडे (३६) याला ताब्यात घेतले.
अजिंक्य हा त्याच्या घरातून अंजनी हॉटेल येथे पार्सन आणण्यासाठी निघाला होता. त्याच्या भरधाव वेगामुळे अपघात घडल्याचे नवनाथ मारुती तावरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार उत्तमगनर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलिस आयुक्त भीमराव टेळे, उत्तमनगर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक युसूफ शेख, गुन्हे पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दादाराजे पवार, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जोशी, पोलिस हवालदार विनोद शिंदे, संग्राम केंद्रे, पोलिस नाईक हजारे, पाडाळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे. पुढील तपास सुरू आहे