पुणे – महाविद्यालयातून घराकडे निघालेल्या 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा हात पकडून विनयभंग करणाऱ्याला तीन वर्षे सक्तमजुरी आणि सहा हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.पी.जाधव यांनी सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिने कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
शंतनू महेंद्र मल्लाव (वय 26, रा. शिरूर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. शिरूर येथे 25 जुलै 2016 रोजी ही घटना घडली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी चार साक्षीदार तपासले. एस.एस.वाघमोडे यांनी या प्रकरणाचा तपास केला.
शंतनू हा पीडितेच्या तोंडओळखीचा होता. फिर्यादी बारावीमध्ये शिकत होती. सायकलवरून ती महाविद्यालयात ये-जा करत असत. घटनेच्या दिवशी पीडित महाविद्यालयात चालली होती. त्यावेळी शंततून आणखी दोन मित्रांसह दुचाकीवरून गेला. दुचाकी आडवी मारून, “मला बोलायचे आहे’ असे तो तिला म्हटला. मात्र, ती न थांबता महाविद्यालयात निघून गेली. दुपारी 3.45 च्या सुमारास ती कॉलेज संपल्याने घराकडे चालली होती. त्यावेळी त्याने हात पकडत तिचा विनयभंग केला. तिला मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यावेळी शाळेती शिक्षकांनी त्याला पकडून पोलीस स्टेशनला नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.