गोल्फ चौक ते गुंजन चौकातील उड्डाणपुलाच्या कामाबाबत मनसेचे रास्ता रोको
येरवडा – महापालिकेच्या वतीने गोल्फ चौक ते गुंजन चौक असा उड्डाणपूल उभारला जात आहे. पण, तो चुकीचा आहे. तसेच त्यात नियोजनचा अभाव आहे, असा आरोप करत या कामाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विमानतळ रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
पालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार सूचना, विनंती अर्ज करूनही मनमानीपणे हे काम सुरू असल्याने मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी यावेळी म्हटले. नियोजनाचा अभाव असलेल्या या उड्डाणपुलामुळे गांधीनगर, यशवंतनगर, जयप्रकाशनगर, भाटनगर या परिसरातील नागरिकांना रस्ता मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.
या संपूर्ण परिसरातील नागरिकांना रास्ता ओलांडण्यासाठी मोठा वळसा घ्यावा लागणार असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. नागरिकांच्या वेळेची व इंधनाचा अपव्यय होणार असल्याचा आरोप मनसेच्यावतीने करण्यात आला आहे.
आंदोलनावेळी पक्षाचे रणजित शिरोळे, सुनील कदम, किशोर चिंतामणी, श्री देसले, जेमा चव्हाण, बाळासाहेब शिंगाडे, अर्चना माछरेकर, दीपाली शिर्के, अरुण येवले उपस्थित होते. या समस्येचा पाठपुरावा मतदारसंघाचे उपविभाग अध्यक्ष मनोज ठोकळ हे करत आहेत.