पुणे – पाच वर्षांपूवी आंबील ओढ्याला आलेल्या पुरात नुकसान झालेल्या सोसायट्या आणि नागरिकांना मोठा फटका सहन करावा लागला. या घटनेनंतर महापालिकेकडून केंद्रशासनाकडे आपल्या महापौरपदाच्या कालावधीत शहरी पूर नियंत्रण आराखडा सादर केला होता.
केंद्राने त्यास मान्यता देऊन सुमारे २५० कोटींचा निधी दिला असून, आंबील ओढ्यासह, शहरात पूर नियंत्रणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यावर आपला भर राहणार असल्याचे आश्वासन भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी दिले.
मोहोळ यांच्या प्रचारार्थ आंबील ओढा, दत्तवाडी, नवीपेठ, पर्वती परिसर भागात पदयात्रा काढण्यात आली. या वेळी मोहोळ यांनी या भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. शहराध्यक्ष धीरज घाटे, हेमंत रासने, सरस्वती शेंडगे, राजेंद्र काकडे, अमित कंक,
प्रशांत सुर्वे, प्रणव गंजीवाले, चंद्रकांत पोटे, संजय देशमुख, छगन बुलाखे, राजू परदेशी, उमेश चव्हाण, राजाभाऊ भिलारे, गणेश भोकरे, नीलेश हांडे, हेमंत जगताप, रवी साने, कपिल जगताप, नीलेश धुमाळ उपस्थित होते.
मोहोळ म्हणाले, केंद्राच्या शहरी पूर नियंत्रण योजनेत पुणे, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बेंगळूर, हैदराबाद आणि अहमदाबाद या शहरांचा समावेश आहे. मी महापौर असताना पुणे महापालिकेने यासंदर्भातला आराखडा केंद्र सरकारकडे सुपूर्द केला होता.
त्या आराखड्याला मान्यता मिळाली असून, शहराच्या विविध भागांमध्ये २५० कोटी रुपयांची पूरनियंत्रणासाठी कामे होणार आहेत. त्यात विशेषत: आंबील ओढ्याची पूरस्थिती रोखण्यावर भर राहणार आहे.